Popular posts from this blog
Assignment 1
By
Pradeep murug
-
असाइनमेंट 1 A- मध्ययुगीन संक्रामण काल प्रकरण 2 मध्ययुगीन भारत व राजकीय घडामोडी या प्रकरणातून आपण खालील गोष्टी जाणून घेऊ . उत्तर भारतात राज्य केलेली राजपूत घराणी . साहित्य , कला आणि शिल्पकलेतील राजपुतांचे योगदान . • तुर्काचे आगमन , महम्मद गझनी आणि महम्मद घोरीच्या भारतावरील स्वाऱ्यांचे परिणाम . • दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना , राज्यकारभार आणि त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान 12 व्या शतकाचा उत्तरार्ध व 13 व्या शतकाचा पूर्वार्ध हा भारताच्या इतिहासातील ' संक्रमणकाल म्हणून ओळखला जातो . संक्रमण म्हणजे एखाद्या समाजाने एका कालखंडातून दुसऱ्या कालखंडात प्रवेश करण्यासाठी केलेली पूर्वसिद्धता होय . या कालखंडात भारताचा प्राचीन युगातून मध्ययुगात प्रवेश झाला . छोटी छोटी राज्ये तुर्कानी नष्ट करुन उत्तर भारतात बलिष्ठ साम्राज्याची स्थापना केली . याकालात इस्लाम धर्माच्या प्रभावामुळे धार्मिक क्षेत्रात एकेश्वरवादाचा प्रसार झाला . यावरुन भारतात मध्ययुगाची सुरुवात झाली याबद्दलची कल्पना येते . तुर्कानी स्थापन केलेल्या साम्राज्याचा अभ्यास करण्याआगोदर
Comments
Post a Comment